Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
8.5 C
New York
Sunday, March 16, 2025

“माझा पराभव राम मंदिरामुळे!!” माझ्या वक्तव्याचा विपर्यास- माजी खा.लोखंडे

मी राम भक्त आणि कारसेवक, वृत्त वाहिन्यांतील वृत्त चुकीचे -लोखंडे यांचा खुलासा

माजी खासदार सदाशिव लोखंडेचा कारसेवक ते खासदार प्रवास

शिर्डी:
राम मंदिर बांधल्यामुळेच माझा पराभव झाला असे काही टिव्ही वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात आले. पंरतु राम मंदिर बांधल्यामुळे मुस्लिम मतांचे झालेले एकीकरण व अकोले तालुक्यात रावण संघटनेने राम मंदिराबाबत केलेला अप्रचार त्यामुळे अपला पराभव झाला असल्याचे आपण वक्तव्य केले होते. या वाक्याचा विपऱ्यास करण्यात आला असल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. वृत्त वाहिन्यांवर राम मंदिरामुळे पराभव झाला असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आपण कारसेवक असून राम मंदिरासाठी जो लढा देण्यात आला त्यात आपण प्रामुख्याने सहभागी झालो होतो. सन १९९० मध्ये सोमनाथ ते आयोध्या जी रथ यात्रा काढण्यात आली होती, या यात्रेचा रथ हा चेंबुर येथे तयार करण्यात आला होता. यावेळी त्याची जबाबदारी आमचे नेते हाशु आडवानी यांच्या मार्गदर्शनाखाली मी पार पाडली होती. त्याचबरोबर संबधित रथ सोमनाथ मंदिरापर्यंत पोहचवण्याचे काम देखील दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली मी भाजपचा वार्ड अध्यक्ष म्हणून पार पाडली होती. तसेच १९८९ साली जी शिला पुजनाचे आंदोलन झाले, देशभरातून प्रत्येक गावातून वीटा पूजन करून सर्व वीटा आयोध्या पोहचवल्या. या शिला पूजनाच्या अभियानाचा देखील मी प्रमुख होतो. १९९२ मध्ये जेव्हा बाबरी मशिद पाडली तेव्हा देखील मी त्या कारसेवेला आयोध्येत होतो. मी एकटाच गेलो नाही तर मी माझ्या वार्डातील शेकडो कारसेवक तेथे नेले होते. मी बालपणापासून संघाचा स्वंयसेवक आहेत. हिंदुत्व माझ्या रक्तात आहे. आमचा डिनए कधीही बदलनार नाही. आम्ही आमचे आयुष्य राम मंदिरासाठी खर्च केलेले आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने सत्ता महत्त्वाची नसून राम मंदिर महत्वाचे असून लोखंडे यांनी सांगितले.
कर्जत येथे औपचारिक गप्पा सुरू असताना काही पत्रकारांनी विचारले की, राम मंदिर बांधले असतानाही तुमचा पराभव कसा काय झाला त्यावर मी रावन संघटनेचा उल्लेख केला. रावन संघटना ही हिंदू विरोधी असून ती आदिवासी समाजात हिंदुत्व व रामाबाबत अप्रचार करत असून त्याचाच फटका आपल्याला अकोले तालुक्यात बसला असल्याचेही लोखंडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्याला सहकारी सर्वच पक्षांची मदत झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोठे सहकार्य केले असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, बाळासाहेब पवार, राहुल गोंदकर, अनिल पवार, चंद्रकांत गायकवाड आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा