Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
8.1 C
New York
Sunday, March 16, 2025

सत्तासंघर्षाच्या निकाला अगोदर संजय राऊत यांनी केला मोठा आरोप!!म्हणाले हे तर..

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन मूळ शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभी फूट पडली. जवळपास 40 शिवसेना आमदार शिंदेंसोबत गेले. यात सुरुवातीला गेलेले 16 आमदारांवर पक्षांतर्गत कायद्यानुसार अपत्रता तसेंच उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेल्या 14 आमदारांवर त्याच पद्धतीने अपात्रता यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत.

हा निकाल आज बुधवारी दुपारी 4 वाजता अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर मोठा गंभीर आरोप केला आहे. नार्वेकर जो निकाल देणार आहेत तो “मॅच फिक्सिंग”चा असणार आहे असा मोठा आरोप खा.राऊत यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. राऊत यांच्या आरोपांमुळे खळबळ उडणार आहे. मॅच फिक्सिंग नुसार निर्णय झाल्यास आम्हांला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जात निकालाआधी झालेल्या गाठीभेटी, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे निकाल असताना आयोजित केलेले दौरे याची माहिती न्यायालयाच्या पटलावर आणावी लागेल असे राऊत म्हणाले.

आज लागणारा निकाल दिल्लीतून फिक्स झाला असून त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 जानेवारीला मुंबई दौरा आयोजित केला असावा. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डाओस दौराही घोषित झाला आहे. याचाच अर्थ निकाल काय लागणार हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे लागणारा निकाल हा दिल्लीतून फिक्स झाला असून याला मॅच फिक्सिंग’च म्हणावी लागेल असे सांगत खा. राऊत यांनी हे घटनाबाह्य सरकार असल्याचा पुनरुच्चार केला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा