Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
9.2 C
New York
Sunday, March 16, 2025

विखे साहेबांनी खुशाल माझ्यावर कारवाई करावी पण.. रोहित पवारांनी दिले प्रतिआव्हान!!

पुणे: तलाठी भर्ती प्रक्रियेत मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आ.रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवारांनी केलेल्या आरोपावर आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे चांगलेच भडकले असून वारंवार बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला आहे. महसूलमंत्री विखे पाटील यांच्या या इशार्यानंतर आ.रोहित पवारांनीही प्रत्युत्तर दिले असून विखे साहेबांना आमच्यावर कारवाई करायची असेल तर खुशाल करावी असे आव्हान दिले आहे.

तलाठी भर्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालात काही उमेदवारांना 200 पेक्षा अधिक मार्क पडल्याची आणि भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे. अशात आ.रोहित पवार यांनी सरकारकडून होत असलेल्या भर्ती प्रक्रियेत मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांकडून वारंवार भर्ती प्रक्रियेत खोटे आरोप होत असल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया देत खोटे आरोप करणाऱ्या रोहित पवारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.

यावर आज गुरुवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी, सरकार कडून होत असलेल्या विविध परिक्षांत सध्या जे काय सुरू आहे त्यावर विद्यार्थीच बोलत आहेत. अनेक परीक्षांचे पेपर फुटत आहेत. आम्ही वेळोवेळी याबाबत सरकार कडे विचारणा करत म्हणणे मांडत असून विद्यार्थ्यांच्या भावना पोचवत असल्याचे सांगितले. आता विखे साहेबांना आमच्यावर कारवाई करायची असेल तर करावी. तसेही आता आमच्यावर अनेक कारवाया सुरू असून अजून कोणत्या बाकी आहेत त्याही कराव्यात असे प्रत्युत्तर दिले. मात्र कारवाई करतानाच विद्यार्थ्यांच्या अडचणी, पेपर फुटी, तक्रारी याकडेही लक्ष द्यावे असे म्हंटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा