Latest news
कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान.. आ.संग्राम जगताप यांच्या हॅट्रिक साठी महायुती एकवटली..शहर भाजप झाली सक्रिय जयश्री थोरातांवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या वसंतराव देशमुखांचा बोलवता धनी कोण?? मिरवणूक भोवली!! जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला समोर विरोधकच नसल्यासारखी परिस्थिती असल्याने आ.संग्राम जगताप सुसाट!! जिल्ह्यात भाजपने घोषित केलेल्या पाच मतदारसंघात असा रंगणार तुल्यबळ सामना!! प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी घोषित होताच नागवडे समर्थकां मध्ये नाराजी
6.7 C
New York
Sunday, March 16, 2025

थोरातांचे ‘भावी मुख्यमंत्री’ फलक.. आणि राम शिंदेंचे भाकीत!!

नगर:
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना विचारल्याशिवाय काही करण्याची हिम्मत कोणात नाही. अशा स्थितीत तेथे त्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे फलक लागले. त्यामुळे त्यांच्या मनातली गोष्ट लपून राहीलेली नाही, परंतु त्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ स्वप्न भंगणार आहे, असा दावा माजी पालकमंत्री व आमदार प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी येथे केला. तुम्ही ओरबाडून सत्ता मिळवली होती, परंतु आता माणसे सांभाळताना तुमची धांदल उडाली आहे. देशात विरोधी पक्ष नेता देता येईल, एव्हडीही संख्या तुमच्या पक्षाला गाठता आलेली नाही, अशी टीकाही प्राध्यापक शिंदे यांनी थोरात यांच्यावर केली.

भाजपचे सध्या घर चलो अभियान सुरू असून त्या अंतर्गत शनिवारी सायंकाळी सावेडी येथील प्रेमदान हडको परिसरात प्राध्यापक शिंदे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या व मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सरचिटणीस सचिन पारखी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, महिला जिल्ह्याध्यक्ष प्रिया जानवे आदीसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अबकी बार 400 पार, जय श्रीराम, भारत माता की जय घोषणा देण्यात आल्या.

यावेळी माध्यमांशी बोलताना प्राध्यापक शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रभावी काम केले आहे व आताही उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून ते कर्तव्यदक्ष काम करीत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे फडणवीस यांच्यावर टीका करताना पातळी सोडत आहेत. ते स्वतः मनोरुग्ण झाले आहेत व त्यांच्या  सत्तेच्या काळात ते घरकोंबडा होते. करोना काळात कोणाच्या दुःखातही सहभागी होत नव्हते. त्यांची निष्क्रियता त्याच वेळी दिसली होती, पण आता निवडणूक असल्याने ते फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत, असा दावा करून शिंदे म्हणाले, विरोधकांनी केलेली राष्ट्रपतीची राजवट मागणी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राज्यातली कायदा व सुव्यवस्था स्थिती चांगली आहे. आपसातील वादातून काही घटना घडल्या असल्या तरी लोकांचे जीव जात असताना त्यावर राजकारण करणे व टोकाच्या टीका करणे, महाराष्ट्राची तुलना बिहारशी करणे हे विरोधकांना शोभत नाही, असा दावाही शिंदे यांनी केला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे जखमी वाघ असल्याचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणत असले तरी त्या जखमी वाघाला आता दात राहिले नाही व तो व्याकूळ झाला आहे. काहीही करू शकत नाही. उलट पाटलांची अवस्था अशी झाली की त्यांनी त्यांच्या पक्षाचा कर्जत तालुक्यात अध्यक्षच नेमला नाही. मात्र, उपाध्यक्ष, सरचिटणीस अशी पदे नेमून इतिहासात प्रथमच अध्यक्ष नसलेली कार्यकारीणी करून त्यांच्या पक्षाची स्थिती दाखवून दिली आहे. कर्जतच्या त्यांच्या मेळाव्यास माणसेच आली नसल्याने घरात तो घ्यावा लागला व फक्त नेते आणि त्यांच्यासमोर माईक असलेले फोटोच काढावे लागले, असा दावाही शिंदे यांनी केला.

उमेदवार कोण आज सांगता येणार नाही !!
-लोकसभेच्या नगर दक्षिण मतदार संघातील भाजपचा उमेदवार कोण हे आज सांगता येणार नाही. राज्याचे पार्लमेंटरी बोर्ड त्यावर चर्चा करून केंद्राच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवणार आहे. तेथून उमेदवारी जाहीर होणार आहे. मी नगर दक्षिणेतून लढण्यास इच्छुक असल्याचे मागेच सांगितले आहे व त्या यादीत माझे नाव आहे, असेही प्राध्यापक शिंदे म्हणाले. देशात आता रामराज्य आले आहे व नगर जिल्हा देशातच असल्याने येथेही रामराज्य आले आहे, असे सूचक भाष्यही त्यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा